HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्राने काकावर विश्वास ठेवावा की पुतण्यावर?”; राजू शेट्टींचा संतप्त सवाल

मुंबई | माजी खासदार राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० व्या ऊस परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसले आहेत. यावेळी, राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. “पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोक्यावर बँडेज आणि दाढी काळी होती. आता माझी दाढी पांढरी झाली तरीही प्रश्न तेच आहेत”, असं राजू शेट्टी म्हणाले. “महाराष्ट्राने काकावर विश्वास ठेवावा की पुतण्यावर?”, असा बोचरा सवाल देखील यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना राजू शेट्टी म्हणाले की, “आपण महाविकास आघाडीचं सरकार आणलं. पावसात भिजत-भिजत हे सरकार आलं. त्यामुळे, यांना महापुराच्या स्थितीची जाण असेल असं वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, मी फसवणार नाही. पण गेल्या काही दिवसांत या सरकारने काय मदत केली ते आपण पाहिलंच. पैसे नाही म्हणाले आणि ११ टक्के महागाई भत्ता दिला”, असं म्हणत राजू शेट्टींनी सरकारवर घणाघाती टीका केली.

एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान!

“गेली १९ वर्षे मी याच मैदानात ऊस परिषदा घेतल्या. दर मागून घेतला. पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोक्यावर बँडेज आणि दाढी काळी होती. आता माझी दाढी पांढरी झाली तरीही प्रश्न तेच आहेत. आता साखरेला चांगला भाव आलेला असतानाही एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलं जात आहे”, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

नेत्यांचं, मंत्र्यांचं काळे झेंडे दाखवून स्वागत करा!

राजू शेट्टी यांनी पुढेही आपला संताप व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारला मोठं आव्हान दिलं आहे. “मी म्हणालो होते की दरसा गोड झाला नाही तर दिवाळीला शिमगा करु. पण आता दिवाळीला गावात येणाऱ्या नेत्यांचं आणि मंत्र्यांचं काळे झेंडे दाखवून स्वागत करा. माझी तुम्हाला विनंती आहे की, त्यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका”, असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

…तेव्हा शेतकरी तुमच्या पाठीशी उभा राहिला!

“महाराष्ट्राने काकावर विश्वास ठेवावा की पुतण्यावर?”, असा बोचरा सवाल यावेळी देखील यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. शरद पवार साहेब, शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ दिलं आहे. पण, ज्यावेळी आमचा प्रश्न आला तेव्हा तुम्ही कारखानदारांची बाजू घेतली. ईडी मागे लागेल म्हणून जेव्हा लोक पळून गेले तेव्हा शेतकरी तुमच्या पाठीशी उभा राहिला. आता पुन्हा कारवाई झाली तर कदाचित आहेत तेही पळून जातील”, असा टोलाही यावेळी राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यस्तरावरुन अधिकचा निधी उपलब्ध करुन घेण्यास पाठपुरावा करणार! – सतेज पाटील

Aprna

‘मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने काय केलं’, नारायण राणेंची शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका!

News Desk

“व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने आम्ही ७ नगरेसवक उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवतोय” – नितेश  राणे

News Desk