HW News Marathi
महाराष्ट्र

‘मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने काय केलं’, नारायण राणेंची शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका!

मुंबई। केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी बोलताना शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने काय केलं? असा सवाल नारायण राणे यांनी केला. तसंच, केवळ मातोश्रीचं परिवर्तन झालं, एकाचे दोन बंगले झाले अशी टीका देखील राणे यांनी केली.

मातोश्रीचं परिवर्तन झालं एकाचे दोन बंगले झाले

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. मग मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन का होऊ शकलं नाही? मोतश्रीचं परिवर्तन झालं. एकाचे दोन बंगले झाले. मराठी माणसाच्या जीवनामध्ये काहीही फरक नाही. आजही मराठी तरुणांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिक घरी जातो तेव्हा चुल पेटली की नाही, आईने काही शिजवलं असेल की नाही, ही चिंता असते. त्यालाही वेळ का आली?” असा सवाल नारायण राणे यांनी केला.३२ वर्षांत मुंबई बकाल करून टाकली. किती माणसं मुंबईत कोरोनामुळे गेले, कुणामुळे? औषधामध्ये देखील यांनी पैसे खाल्ले आहेत. शिवसेनेने अशी वेळ आणू नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवा आणि मग काय करायचं ते करा,” असं राणेंनी म्हटलं.

पिंजऱ्यात राहतो… हा कसला मुख्यमंत्री

आताचे राज्य, या राज्याला मुख्यमंत्री आहे, मला वाटत नाही. मुख्यमंत्री कोण आहे? काही दम नाही ओ, पिंजऱ्यात राहतो…हा कसला मुख्यमंत्री? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही,” अशी टीका राणे यांनी केली. “जनतेत जायला पाहिजे, प्रश्न काय, अडचणी काय, काय केल्याने बेकारी जाईल यावर विचार केला पाहिजे,” असं नारायण राणे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस कितीही प्रयत्न करा, बिघाडी काही होत नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल !

News Desk

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले!

News Desk

‘संतोष बांगर पुन्हा निवडून आल्यास मी माझी सर्व संपत्ती दान करेन’; युवासेना कार्यकर्त्याचं आव्हान

Manasi Devkar