HW News Marathi
महाराष्ट्र

एकरकमी FRP द्या, अन्यथा चारचौघात बेइज्जत करू ! राजू शेट्टींचा इशारा

सांगली । सांगली जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी एफआरपी दिलेली नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिल्या टप्प्यात आशा कारखानदारांचे पुतळे जाळण्यास करण्यास सुरुवात केली आहे. जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर साखर सम्राटांना चारचौघात बेइज्जत करून यांना सुखाची झोप लागून देणार नाही असा थेट इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

सांगलीच्या स्टेशन चौकात केंद्राच्या कृषी विषयक कायद्याविरोधात सर्वपक्षीय किसान सभेचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्राचे काळे कायदे रद्द करण्यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचे सांगितले. राजू शेट्टी यावेळी म्हणाले की, ऊसदर नियंत्रण 1966 च्या कायद्यानुसार ऊस तोडणीनंतर 14 दिवसात एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र पदविधरांची मते पदरात पाडून घेण्यासाठी साखर सम्राटांनी बैठकीत FRP देण्याची घोषणा केली. मात्र केवळ उचल देऊन त्यांनी विश्वासघात केला आहे”, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी याच पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानीकडून पुतळे जाळण्याची घोषणा केली आहे .उद्यापासून त्याचे राज्यभर पडसाद उमटणार असून पुढील काळात कारखानदारांनी काटेमारी बाहेर काढणे असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात नौदलाचे लढाऊ विमान कोसळले, सुदैवाने पायलट बचावले

News Desk

सार्वजनिक निवडणूकीत देखील ६० टक्केपेक्षा जास्त मतदान होत नाही

News Desk

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ११ एप्रिलपासून सुरु होणार

News Desk