HW News Marathi
Covid-19

राजू शेट्टींनी थेट साधला मुख्यमंत्री अन् शरद पवारांवर निशाणा

कोल्हापूर । “मुख्यमंत्री नसताना त्यांनी जी मागणी केली ती मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण केली असती तर शेतकरी समाधानी झाला असता”, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कोल्हापूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १९ व्या ऊस परिषदेच्या निमित्ताने बोलताना राजू शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना येत्या ५ नोव्हेंबरला देशात किमान २ तास रास्ता रोको करणार असल्याची घोषणा देखील केली आहे. महाराष्ट्राचा कोणताही प्रदेश अतिवृष्टीपासून वाचला नाही. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. जागतिक तापमान वाढ हे या मागचं कारण असल्याचं अभ्यासक सांगतात. मात्र, याला शेतकरी जबाबदार आहे का ? मग त्यानेच का भोगायचं? असा संतप्त सवाल यावेळी राजू शेट्टींनी केला.

शरद पवारांवरही केली अप्रत्यक्ष टीका

राजू शेट्टी यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. “ऊस तोडणी कामगारांनी आंदोलनाची हाक दिल्यावर काही नेत्यांनी तातडीने पुढाकार घेऊन त्यांचा प्रश्न सोडविला. मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून कोणी असा पुढाकार घेत नाही ?”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोनाच्या तिसरी लाटेत लहान मुलांची काळजी कशी घ्याल ?”, मुख्यमंत्री म्हणाले…

News Desk

राज्यात ११,८१३ नवे रुग्ण तर मुंबईत ७९ टक्के रिकव्हरी रेट

News Desk

महाराष्ट्रात अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, महापौरांकडून स्पष्ट

News Desk