HW News Marathi
महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडीतून बाहेर, राजू शेट्टींची मोठी घोषणा

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यश्र राजू शेट्टी यांनी केली आहे. महाविकासआघाडीशी आमचे संबंध तूटले असून आमचा मार्ग वेगळा आणि महाविकासआघाडीचा मार्ग वेळा असे राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टींनी आज (५ एप्रिल) कोल्हापूरच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या सभेत महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजू शेट्टी हे महाविकासआघाडी सरकारवर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु आज अखेर राजू शेट्टींनी महाविकासआघाडीतून बाहेर पडल्याची घोषणा केल्यानंतर आता महाविकासआघाडीला मोठा धक्का बसणार आहे. आता महाविकासआघाडीचे नेते यावर काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींचे माझे नाव वगळ्यामुळे महाविकासाघाडीतून बाहरे पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. शेट्टींनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितील आहे. राजू शेट्टी म्हणाले, “महाविकासआघाडी सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आले होते. साताऱ्यातील सभेत पवार साहेबांनी भिजत भाषण केले होते. तेव्हा राज्यभरातील शेतकरी विरघळून गेले. दिल्लीत तिन्ही पक्षातील नेत्यांची भूमिका वेगळी दिसत होते. राज्याच्या मुख्यमंत्री निवडीच्या वेळीस मी सूचक म्हणून चालतो. परंतु, शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना मला साधे विचारले सुद्धा नाही. सरकारने ऊस दर नियंत्रण समितीत शेतीचा काही संबंध नसलेले लोक घेतले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देशभरात सुमारे 5000 महिलांनी केली कुपोषणाबाबत जनजागृती

News Desk

पर्यावरण पूरक गणेश मुर्ती, सांगली जिल्ह्यातला आदर्श उपक्रम

News Desk

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५जणांचा मृत्यू तर ५ जखमी; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Aprna