HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींसाठी भाजप नेते राम कदम यांचे सरकारविरोधात मंत्रालयाबाहेर लाक्षणिक उपोषण

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. या मागणीसाठी आमदार राम कदम यांनी काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळला. तसेच मंत्रालयाच्या समोर गांधी स्मारकासमोर उपोषण करणार असल्याचंही राम कदम यांनी सांगितलं आहे. तसेच, या बद्दल त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचींही भेट घेतली होती.

महाराष्ट्र सरकारने जुलमी पद्धतीने आणीबाणी पुकारली आहे. डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण ज्या पद्धतीने पत्रकारांना तुरुंगात डांबले जात आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात हे लाक्षणिक उपोषण केल्याचा माहिती भाजप नेते राम कदम यांनी दिली. तसेच, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारितेवरील हल्ला आहे.

पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. अर्णव गोस्वामी यांची तातडीने सुटका करा आणि सूडबुद्धीने केलेले त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावरील आरोप मागे घ्या, अर्णव यांच्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या ९ पोलिसांना निलंबित करा, या मागणीवरुन आमदार राम कदम यांनी काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळला. महाराष्ट्रातल्या अप्रत्यक्ष आणीबाणीविरोधात उपोषण करणार असल्याची घोषणाही भाजपाच्या राम कदम यांनी केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांना मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मंत्रालयाच्या समोर उपोषणाला बसलेल्या राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. अर्णव गोस्वामी यांना सोडावं या मागणीसाठी राम कदम यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरू केलेलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपलं लाक्षणिक उपोषण सुरूच राहील, असं त्यांनी म्हटलेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मला काही चुकीचे वाटत नाही!”

Aprna

जिल्हा सहकारी बँकांमध्ये केंद्राचा हस्तक्षेप, अजित पवार म्हणाले याविरोधात न्यायालयात जाणार!

News Desk

महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले,गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक खुलासा !

News Desk