HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंना पक्ष सोडायचाच होता तर रिपाई चांगला पर्याय होता – रामदास आठवले

बारामती | केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले आज (२२ ऑक्टोबर) अतिवृष्टीग्रस्त बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांनी खडसेंच्या राजीनाम्याविषयी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसेंसोबत १५-१६ आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. ते आमदार नसल्याने राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही, असं आठवले यांनी सांगितलं आहे. खडसेंनी रिपाईमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांना रिपाई हा चांगला पर्याय झाला असता. पण ते राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

माझ्या संपर्कात १५-१६ आमदार असल्याचा दावा नेते एकनाथ खडसे करत असले तरी रिपाई नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खडसेंचा हा दावा फेटाळून लावला आहे. खडसे एकटेच राष्ट्रवादीत जातील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत १५ आमदार जाणार नाहीत, असा दावा करतानाच त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांनी रिपाइंत यायला हवं होतं, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

पूरग्रस्ताना केंद्रकडून मदत मिळणारच आहे. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची सर्वात आधी राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्याने आधी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माहिती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जीएसटीचे केंद्राकडे बाकी असलेले पैसे मिळतील, पण सद्यस्थितीबाबत सर्वांनी मिळून केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार; सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

News Desk

केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतींना अभिवादन!

News Desk

बेरजेचे गणित देशाच्या अर्थकारणातही टिकले तर अर्थव्यवस्थेचे आरोग्य धडधाकट राहील!

News Desk