HW News Marathi
Covid-19

केंद्राच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे तोंड बंद ! रामदास आठवले

नवी दिल्ली | केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचे कौतुक करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच “पंतप्रधानांचा आदर्श घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकारनेही राज्यातील गरिबांना मदत करावी”, असा सल्ला आठवले यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. देशातील १८ वर्षावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण मोफत करण्याचा आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून देशातील तब्बल ८० कोटी नागरिकांना येत्या दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरून रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर तोंडसुख घेतले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाचंचे कौतुक करताना आपल्या ट्विटमध्ये रामदास आठवले म्हणतात कि, “१८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस आणि गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे केंद्रावर टीका करणारे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले आहे”अशी टीकाही आठवले यांनी केली आहे. तसेच, “महाविकास आघाडीने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील गरिबांना त्वरित मदत करावी”, असा सल्लाही यावेळी रामदास आठवले यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (७ जून) येत्या २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राज्य सरकारला मोफत कोरोना लस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वी १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची राज्यांकडे दिलेली जबाबदारी केंद्र सरकारने आता पुन्हा स्वतःकडे घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने २ कोटींचा ओलांडला टप्पा!

News Desk

देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लसींचा साठा कमी पडला नसता !

News Desk

दारूची दुकाने खुली मात्र जिम बंद, हे दुर्दैवी ! फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk