HW News Marathi
देश / विदेश

“राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा”- रामदास आठवले

नागपूर | राज्यसभेत झालेल्या धक्काबुकीचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारावरून आता राजकारणात बरीच खळबळ माजली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना

रामदास आठवले यांनी संसदेत घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले आहे.

राहुल गांधी कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानावर मस्तक टेकवतात. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा भारत उभा करायचा आहे. त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण असल्याचे आठवले यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी मुळेच काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली

रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळेच आज काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी संसदेत दंगा घालण्याचे काम केले. संसदेत काम होऊनच द्यायचे नाही, या निर्धाराने काही लोकांना पाठवण्यात आले होते. विरोधी पक्षाचे सदस्य सतत सभागृहाच्या वेलमध्ये येत होते. या सगळ्यांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज पुन्हा पेट्रोल १५ तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम सरकारचे आहे – शरद पवार

News Desk

आईचे दूध मिळत नसल्याने दरवर्षी अडीच लाख बालकांचा मृत्यू

News Desk