HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आमचे हे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु, आठवलेंचा गौप्यस्फोट

सांगली | १ मार्च ते १० मार्च राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा अद्याप सुरू असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘राज्यातील सरकार घालवण्याचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व आमचे प्रयत्न सुरू आहेत,’ असं आठवले यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे.

सांगली येथे आज (१५ मार्च) आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ‘राजकारणात काहीही होऊ शकतं. कदाचित नाना पटोले सुद्धा आमच्या सोबत पुन्हा येऊ शकतात. पण राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे सत्तेत राहील, अशी परिस्थिती नाही. हे सरकार घालवून आमचं सरकार आणण्याचा फडणवीस, चंद्रकांतदादा आणि माझा प्रयत्न सुरू आहे,’ असं आठवले म्हणाले आहेत.

‘महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि करोनाची परिस्थिती देखील गंभीर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार करावा लागेल. राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ येऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम करून कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी,’ असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…नाहीतर भाजप खासदारांना ठोकणार”, हर्षवर्धन जाधवांचा थेट इशारा

News Desk

SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय

News Desk

लोकशाही विरोधात भारतीय जनता पक्षाचा कट ! सचिन सावंत

News Desk