HW News Marathi
महाराष्ट्र

“दोन पक्षांनतर तिसऱ्या पक्षातील प्रकरणही बाहेर येईल”, रामदास आठवलेंचा कॉंग्रेसवर निशाणा

नांदेड | आधी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केले. त प्रकरण ताजं असतानाच शिवसेना नेते संजय राठोड यांचा टिक टॉक स्टार पूजा चव्हाण हीच्या आत्महत्येत त्यांचे नाव पुढे आले. दरम्यान, या प्रतकणी संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामाही दिला आहे. मात्र, या प्रकरणात चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. या सर्व प्रकारावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.

सरकारमधील दोन पक्षातली प्रकरणं बाहेर आली आहेत, तिसऱ्या पक्षातील प्रकरण लवकरच बाहेर येईल, असा सूचक इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी करत कॉंग्रेसला टार्गेट केले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच वनमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविषयी आठवले भाष्य करत होते.

“तिसऱ्या पक्षातील प्रकरणही बाहेर येईल”

“राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे आहे. सध्या दोन पक्षातील प्रकरणं बाहेर आली आहेत. तिसऱ्या पक्षातील प्रकरणही लवकरच बाहेर येईल” असा दावा रामदास आठवले यांनी केला. धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांच्याविषयी प्रश्न विचारला असता रामदास आठवले यांनी मिश्कीलपणे हे भाष्य केलं. आठवले नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“उद्धव ठाकरे मवाळ झाले”

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडकल्यामुळे ते मवाळ झाले आहेत, अशी टीकाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवर वाद आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असंही आठवले म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या NCB अधिक्षकाला विनयभंगाप्रकरणी अटक!

News Desk

अभिनेत्री सविता मालपेकर हाती घेणार राष्ट्रवादीचा झेंडा!

News Desk

नामांतर करताना मानहानी होऊन उद्रेक होणार नाही ना याचा विचार करावा – उदयनराजे भोसले

News Desk