HW News Marathi
महाराष्ट्र

रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती । रामकथा (Ramkatha) हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी (५ मार्च) येथे सांगितले.

बडनेरा येथील मैदानावर आयोजित माँ कनकेश्वरी देवी जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित रामचरित मानस कथागंगा संमेलनाला फडणवीस यांनी भेट देऊन रामायण ग्रंथ व माताजींचे दर्शन घेतले. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माँ कनकेश्वरी व रामायणाचे दर्शन घेण्याचे भाग्य आज लाभले, अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.  उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काही वेळ कार्यक्रमस्थळी थांबून रामकथेचे श्रवण केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठवली

News Desk

मागील पिढीने नाथ्ऱ्याचे नाव राज्यात आणि देशात केले, आम्ही आणखी मोठे करू – धनंजय मुंडे

News Desk