HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांवरुन राणे पिता-पुत्रांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, केली राजीनाम्याची मागणी

मुंबई | उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना सीबीआयकडून प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्यामुळे गृहमंत्रिपदावर असणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. हाच मुद्दा घेऊन भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. परमबीर सिंग यांनी ज्यांना १०० कोटींबद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

नितेश राणेंच ट्विट काय आहे?

“नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतंय. ज्यांना परमवीर सिंह यांनी १०० कोटींबद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ? ” असं राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

नारायण राणे काय म्हणाले?

“परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या दाव्यात सीबीआयने १५ दिवसांत चौकशी करुन अहवाल द्यावा, असे माननीय उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाबद्दल बहुतांशी राजकारणी प्रतिक्रिया देत आहेत. या केसशी संबंधित असलेल्या सचिन वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत? किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा का देत नाहीत?” असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण?

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय ठाकरे सरकारसाठी धक्का मानला जात आहे. मुंबई हायकोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेले आहेत. देशमुखांकडून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देशमुखांनी दिले होते, असा ओरोप सिंग यांनी केलेला आहे. त्यावर अॅड. जयश्री पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणाची सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले. याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर देशमुख यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून गृहमंत्रिपदाचा राजीमाना दिला.

राजीनामा देण्याआधी राष्ट्रवादीची दोन तास खलबतं

कोर्टाचा निर्णय आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोजक्याच नेत्यांची शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक आणि स्वत: अनिल देशमुखही उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी राजीनामा द्यावा की देऊ नये याबाबत सुमारे दोन तास खलबतं झाली. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?” देशमुख प्रकरणावरून राऊतांचा सवाल!

News Desk

मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांसाठी नवीन औद्योगिक धोरण तयार करणार – धनंजय मुंडे

News Desk

एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

News Desk