HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुख राजीनामा देऊन थेट दिल्लीला रवाना

मुंबई | महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने १०० कोटी खंडणीप्रकरणाची चौकशी CBI कडे दिली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी शरद पवारांना भेटून, त्यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन राजीनामा सोपवला. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर ते मुंबई विमानतळाकडे रवाना झाले होते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अनिल देशमुख दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत ते कोणत्यातरी महत्वाच्या व्यक्तीला भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अजूनही नेमकी कोणाला भेटायला जात आहेत याची ठोस माहिती मिळाली नाही आहे.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचे पत्र जसंच्या तसं

प्रति

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदरणीय महोदय

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.

आपला

अनिल देशमुख

आज काय घडलं?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं.

त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआयला १५ दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग, पवारांच्या जवळचे मंत्री भेटीला

News Desk

फडणवीसांच्या मागण्यांना अजित पवारांकडून प्राथमिकता, एक राजकीय आदर्श की घट्ट मैत्री?

swarit

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कधी करणार?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

News Desk