HW News Marathi
Covid-19

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती ! । जितेंद्र आव्हाड

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती. हे आधीच्या सरकारापासून सुरु होते. त्याचप्रमाणे, शुक्ला यांनी वेगळ्याच नावांसाठी फोन टॅपिंगच्या परवानग्या घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केले”, असा अत्यंत गंभीर आरोप जितेंद्र आव्हान यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई होणार असल्याचा इशाराही यावेळी आव्हाड यांनी दिला आहे.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय !

फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “फोन टॅपिंग करणं हा मोठा गुन्हा आहे. तसेच कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्याला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक असते. रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारची परवानगी गेतली होती का? सिताराम कुंटे यांनी या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे दिले आहे. रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केलेत. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती. हे आधीच्या सरकारापासून सुरु होते. त्यांचे याबाबतच एक पत्रही उघडकीला आले. त्यानंतर त्यांनी आपली चूकही कबूल केली होती”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभाग आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले !

रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगसंबंधित आरोप करताना जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, “रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करुन नंतर त्याचा वापर करायचा असे प्रकार यापूर्वीही केलेले आहेत. रश्मी शुक्ला यांनी आपल्या वरिष्ठ नोकरशाहांचा विश्वासघात करुन ही गद्दारी केली आहे. इतकेच नव्हे तर पोलीस विभाग आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले. त्यानंतर त्याला बदल्यांमधील भ्रष्टाचाराची जोडही दिली. ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत ती नावे इतकी चिल्लर आहेत की त्यांचे फोनही कुणी घेणार नाहीत. हे एक षडयंत्र रचले गेले आहे”, असेही जितेंद्र आव्हाड त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार,टोपे साहेब साताऱ्यात या,कोरोना नियंत्रणात आणा – शिवेंद्रराजे भोसले

News Desk

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

News Desk

ठाकरे सरकार स्थिर, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या पाठिंशी उभे !

News Desk