HW News Marathi
महाराष्ट्र

निकालापूर्वी विजयी मिरवणूक काढणाऱ्या रत्नागिरीच्या उमेदवारवर गुन्हा दाखल

रत्नागिरी | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान पार पडले आहे. यानंतर आता सर्वांना उद्या (२४ ऑक्टोबर) निकालाची ओढ लागली आहे. निकाल लागण्यापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी विजय मिरवणूक काढली. यामुळे कदमांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर कदम आणि समर्थकांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना समज दिली.

पोलिसांच्या या आवाहनाला न जुमानता संजय कदम यांचा समर्थकांनी मिरवणूक चालू ठेवली. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली. पोलिसांनी त्यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम १४३, १४७, १४९, २६८, २९० अंतर्गत यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन्ही राजे भिडले, गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

News Desk

“नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही”

News Desk

राष्ट्रवादी भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

News Desk