HW News Marathi
महाराष्ट्र

मोर्चाहून परतणाऱ्या सहा मराठ्यांवर काळाची झडप

मुंबई : येथे काल झालेल्या भव्य मराठा मूक मोर्चाहून परतताना झालेल्या भीषण अपघातांमध्ये एकूण जणांचा सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्येऔरंगाबादेतील ४ आणि मुंबईतील दोघांचा समावेश आहे.

काल संध्याकाळी सहाच्या सुमारास मोर्चा आटोपून विनायक ढगे, विल्सम जोसेफ, सिद्धार्थ म्हसे आणि सिद्धार्थ चव्हाण हे मोटरसायकलवरून चेंबूर येथे घरी परतत असताना अपघात झाला होता. भक्ती पार्क मोनोरेल स्थानकाजवळ एका ट्रकने त्यांना उडवले. या विनायक आणि सिद्धार्थ यांचा मृत्यू, तर सिद्धार्थ चव्हाण हा गंभीर जखमी आहे.

मुंबईतील अपघातानंतर वैजापुर तालुक्यातील नांदगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारचा चक्काचुरा झाला असून, ४ जणांचा जागीच मृत्यू, तरदोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरवैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हर्षल अनिल घोलप (२८, रा. गावठाण, रुकडी पुणे), नारायण कृष्‍णा थोरात (२१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे आणि गौरव प्रजापती (२३, रा. बजाज नगर, जि. औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा! – नाना पटोले

Aprna

अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र !- बाळासाहेब थोरात

News Desk

विरोधक कुठे आहेत?विरोधक तर बिहार मध्ये आहेत! महाराष्ट्राच्या संकटाच्या काळात शरद पवार धावून येतात–धनंजय मुंडे

News Desk