HW News Marathi
महाराष्ट्र

“शिवसेना, भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही पवार यांनी सरकार बनवलं” – रावसाहेब दानवे

पुणे | ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांच्या राज्यातल्या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला जातो, असं वक्तव्य शरद पवार नेहमी करत असतात. याच वक्तव्यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. सत्तेचा दुरुपयोग केंद्र सरकारकडून केला जात नाही. उलट राज्यात केला जातो. शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं. पण सरकार बनवलं हा सत्तेचा दुरुपयोग नाही का ? असा सवाल दानवे यांनी केला.

सत्तेचा दुरुपयोग हा केंद्र सरकारकडून केला जात नाही

सत्तेचा दुरुपयोग हा केंद्र सरकारकडून केला जात नाही. राज्यात शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं तरीही सरकार बनवलं, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.

त्याचप्रमाणे रावसाहेब दानवे यांनी वीजटंचाईला राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे कोळसा टंचाई झाली असा दावा त्यांनी केला होता. पावसाळ्यात खदाणीत पाणी साचने किंवा कोळसा भिजण्याची अडचण होते, त्यामुळे राज्यांना कोळसा उचलण्याच्या केंद्राने सूचना दिल्या होत्या. पण, पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे टंचाई झाली. कोळसा टंचाईच्या संकटाला राज्य जबाबदार आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजू शेट्टीच नाही तर अन्य दोघांवरही टांगती तलवार?’

News Desk

भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल!

News Desk

“माझ्या पती आणि सासूच्या देहावर उभे राहिलेले रिपब्लिक चॅनेल बंद झाले पाहिजे”, अक्षत अन्वय नाईक यांची मागणी

News Desk