HW News Marathi
देश / विदेश

चुकीची माहिती दिल्याने मुख्यमंत्र्यांसह सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी ?

मुंबई । निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. या तिन्ही नेत्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची, खोटी माहिती देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाकडून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे याबाबत विनंती करण्यात आली आहे.

जर हे आरोप सिद्ध ठरले तर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२ अ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन दंड, तुरुंगवास किंवा दोन्ही होऊ शकतात. दरम्यान, शिवसेनेकडून राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी याबाबत स्पष्टीकरण देत हा नियमित चौकशीचा भाग असल्याचे म्हटले आहे. “आयकर प्राधिकरणासह प्रतिज्ञापत्रात दिलेली माहितीची तपासणी करणे ही नियमित होणाऱ्या प्रक्रियेचा भाग आहे. या प्रकरणात काही नवीन नाही”, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीकडून देखील याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील ही निवडणूक आयोगाची नियमित प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. “निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीची आयकर विवरणासह तुलना केली जाईल. त्यात जर काही अडचणी अथवा काही विशिष्ट प्रश्न असतील तर आम्ही त्याला उत्तर देऊ”, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जगातील १०० टॉप ब्रॅण्ड्समध्ये टाटा समूह ठरला एकमेव भारतीय ब्रँड

News Desk

“गुलाम नबी आझाद म्हणजे काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब”

News Desk

“मुसलमानाचा DNA इथलाच आहे, बाळासाहेब ठाकरे पण हेच सांगायचे!”, सेनेचा भाजपला टोला

News Desk