HW News Marathi
Covid-19

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानात सहभागी व्हा ! जयंत पाटलांचा थेट संरपचांना फोन

सांगली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाची व्याप्ती गावपातळीवर वाढण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी थेट जिल्ह्यातील सरपंचांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधला.

यावेळी सरपंचांसोबत संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले की, आपल्या देशात कोरोना पसरायला सुरुवात फेब्रुवारी महिन्यात झाली, पाहता पाहता कोरोना आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. अशा वेळी गावचा प्रथम नागरिक या नात्याने आपल्या गावच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आपण विशेष खबरदारी घेतली पाहिजे. प्रत्येक कुटुंबांतील वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे असे पाटील म्हणाले.

कोरोना नियंत्रण अधिक प्रमाणात करण्यासाठी शासनामार्फत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम प्रत्येक गावात सुरू झालेली आहे. यामध्ये वैद्यकीय पथक प्रत्येक कुटुंबास भेट देऊन त्यांचे प्रबोधन करण्यासोबतच त्यांचे शरिराचे तापमान व आॅक्सीजनची पातळी तपासणी करणार आहे. गावातील प्रथम नागरीक या नात्याने आपण गावातच थांबून आपल्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी गावातील को-मॉरबीड लोकांना ओळखण्यासाठी वैद्यकीय पथकास सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रत्येक गावाने स्वयंस्फूर्तीने “जनता कर्फ्यूचा” अवलंब करावा !

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने चांगल्या प्रकारचे मास्क, सॅनिटायझरचा वापर वारंवार करणे , यासाठी गावचा कुटुंब प्रमुख या नात्याने प्रबोधन करावे. तसेच गावातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने गावात गरजूंना मास्क, सॅनिटायझर,औषधे इ. वाटप करण्याचा प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांस प्रतिबंध करावा, उत्सव, संभारभ शक्यतो टाळ्यण्याचा प्रयत्न करावेत. प्रत्येक गावाने स्वयंस्फूर्तीने “जनता कर्फ्यूचा ” अवलंब करावा. गावातील गरजा गावातच भागविण्याचा शक्यतो प्रयत्न करावा व आपल्या गावाचे संरक्षण करावे. लक्षणे दिसल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेण्यासाठी प्रबोधन करावे.

कॉन्फरन्स कॉलमध्ये जिल्ह्यातील ४०० सरपंच सहभागी

एखाद्या कुटुंबातील व्यक्ति पॉझिटिव्ह आल्यास त्याला धीर देण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या लक्षणांचा तीव्रता को-मॉरबीडीलीटी लक्षात घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने होम आयसोलेशन किंवा रुग्णालयात दाखल करणे याबाबत मदत करावी. ज्यांना रुग्णालयात दाखल करावयाचे आहे अशांना हेल्पलाईन नंबरवर फोन करून जिथे बेड्स उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी त्वरीत पाठविण्याची व्यवस्था करावी. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करावे व आपल्यासोबतच गावातील प्रत्येक सदस्यास सुरक्षित ठेवावे व प्रशासनास सहकार्य करावे. या कॉन्फरन्स कॉलमध्ये जिल्ह्यातील ४०० सरपंच सहभागी झाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात तुर्तास लॉकडाऊन नाही…पण..अजित पवारांनी काय दिला अल्टिमेटम?

News Desk

देशात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट, २४ तासांत आढळले ३ लाखांच्या पुढे रुग्ण

News Desk

राज्यात आज ४ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk