HW News Marathi
महाराष्ट्र

गोदावरी पाणी प्रश्नाबाबत आमदारांचा बेफिकीरपणा

औरंगाबाद | पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असल्याने मराठवाड्यातील पाणीप्रश्नाच्या चर्चेसाठी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत अपेक्षेनुसार कमी आमदारांची हजेरी लागली होती. बैठकीसाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील ५६ आमदारांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. त्यातले फक्त १८ आमदार उपस्थित होते . त्यातले अवघे पाचच बैठकीतल्या चर्चेत शेवटपर्यंत हजर होते. केवळ आमदारांनीच नाही तर खाजदारांची हजेरीही निराशा जनक होती.

आठ खाजदारांपैकी एकही खाजदारानी पाणीप्रश्न चर्चेच्या बैठकीत उपस्थित नसल्याने मराठवाड्यातील लोकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.या बैठकीत हक्काचे पाणी सोडण्याची मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना करावी असा निर्णय घेण्यात आला.मार्चला बजेटमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष सवलती मिळावी म्हणून मराठवाड्यातील सर्व आमदारांनी एकजूट दाखवून योजना मंजूर करून घेण्याच्या मुद्द्यावरही उपस्थितांचे एकमत झाले आहे.

वरच्या भागात धरणे बांधल्यामुळे मराठवाड्यात कमी पाणी येते. यामुळे आत्महत्येत वाढ होत आहे.तसेच शरद पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिले तर अतिरिक्त पाणी मिळण्यास मदत होईल.असे बैठकीच्या दरम्यान प्रशांत बंब यांनी वक्तव्य केले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पायाभूत सुविधा आणि विकास प्रक्रियेची कामे थांबणार नाहीत! – अजित पवार

Aprna

सचिन वाझेंना लक्ष्य केलं जातंय – संजय राऊत

News Desk

लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे !

News Desk