HW News Marathi
देश / विदेश

भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच, जिल्हाध्यक्षांकडे ७४ राजीनामे

बीड | बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आत्तापर्यंत ७४ राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीसह ३ सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. दरम्यान, काल (११ जुलै) भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीत गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या मोदी भेटीनंतर काही बदल होणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान पंकजा मुंडे दिल्लीमध्ये गेल्यामुळे आणि कार्यकर्ते जे पंकजा मुंडे यांना भेटायला मुंबईला जाणार होते. त्यांनी आपला मुंबईचा दौरा स्थगित केला आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी बारा वाजता पंकजा मुंडे यांच्या परळीतल्या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची पंकजा मुंडे यांच्यासोबत भेट होणार आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पडसाद बीडमध्ये उमटू लागले आहेत. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 74 राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप कार्यकर्ते नाराजी सत्र सुरु होताच जिल्ह्यातील ७ तालुका अध्यक्षांनी राजीनामे दिले होते.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

भाजपमध्ये फक्त प्रीतमताईंचंच नव्हे तर हीना गावितांचंही नाव चर्चेत होतं. पण पक्ष विचार करुनच निर्णय घेतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. प्रीतमताईंचं नाव चर्चेत होतं, त्यांचं नाव योग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नव्हे तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं आहे. पण नवीन लोकांना संधी द्यायला हरकत नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या. प्रीतम मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर राजकारणात आल्या. पहिली टर्म त्यांना साहेबांच्या कामांमुळे, भावनेमुळे लोकांनी निवडून दिलं. पण दुसरी टर्म त्या त्यांच्या स्वतःच्या विकास कामावर निवडून आल्या. माझ्या कुटुंबाने पक्षासाठी आयुष्य दिलंय. आम्ही कधी कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही. आम्ही नाराज नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकजुटीने कोरोनारूपी रावणाचा नाश करूया ! विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

News Desk

विकास दुबे पोलीस चकमकीत ठार !

News Desk

जम्मू-काश्मीरमधील पूंछ, राजौरी जिल्ह्यात उभारणार प्रत्येकी २०० बंकर्स

News Desk