HW News Marathi
महाराष्ट्र

आज दुपारी १ वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा (एच.एस.सी.) निकाल आज (२८ मे) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. राज्य मंडळाकडून परिपत्रक जारी करून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये बारावीची परीक्षा पार पडली. सीबीएसई, आयसीएसई इत्यादी मंडळांचे निकाल मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात जाहीर झाले आहेत.

राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी व ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थीनी आहेत. राज्यातील ९ हजार ७७१ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख ६९ हजार ४४६, कला शाखेतून ४ लाख ८२ हजार ३७२ तर वाणिज्य शाखेतील ३ लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

या वेबसाईटवरून जाणून घ्या निकाल –

  • www.mahresult.nic.in
  • www.hscresult.mkcl.org
  • www.maharashtraeducation.com
  • www.maharashtra12.jagranjosh.com
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या – जयंत पाटील

News Desk

भाजपने जे पेरले तेच उगत आहे- राज ठाकरे

News Desk

गजानन काळेंचा जमीन अर्ज कोर्टाने फेटाळला! अडचणीत वाढ

Jui Jadhav