HW News Marathi
महाराष्ट्र

गजानन काळेंचा जमीन अर्ज कोर्टाने फेटाळला! अडचणीत वाढ

नवी मुंबई | मनसेचे पदाधिकारी गजानन काळे यांच्या अडचणीत भर पडली आहे. गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे कोर्टानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झालीय. काळे यांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची 15 पथकं विविध भागात रवाना झाली आहेत. असं असलं तरी अद्याप गजानन काळेचा शोध लागू शकलेला नाही. काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांचा मोबाईल बंद आहे.

राज ठाकरे कोणती भूमिका घेणार?

गजानन काळेंच्या पत्नीला अजूनही न्याय मिळाला नसल्याने त्या आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास स्थानी गेल्या आहेत. मात्र राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असल्याने त्या त्यांच्या वडिलांसोबत शर्मिला ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या जवळ आपली बाजू मांडणार आहेत. आता गजानन काळे प्रकरणावर राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

काय आहे प्रकरण?

मनसेचे नवी मुंबईतील गजानन काळे यांच्या पत्नीने आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. माझ्या पतीने नवी मुंबई महापालिकेच्या वाहन विभागात भ्रष्टाचार केला आहे. येथील एका जागेच्या भरतीसाठी अडीच लाख रुपये घेतले होते. या भ्रष्टाचारामध्ये पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली आहे, असा खळबळजनक आरोप गजानन काळेंच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आज केला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गजानन काळेंवर गंभीर आरोप केले. तसेच पोलिस माझ्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी माझ्यावरच दबाव आणत आहेत. गेले तीन दिवस गजानन काळेंवर कोणतीही कारवाई झालेली नाही. अनेक पत्रकारही मेसेज पाठवून माझ्यावर दबाव आणत आहेत, असेही आरोप संजीवनी काळे यांनी केले आहेत.

भ्रष्टाचारात सामील आहेत

गजानन काळे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाहन विभागात भ्रष्टाचार केला आहे. एक जागा भरण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले जात होते. पालिकेतील अनेक अधिकारी त्यांच्यासोबत या भ्रष्टाचारात सामील आहेत. पालिकेचे वॉर्ड ऑफिसर आणि इंजिनिअर यांचे अनेक कॉल्स यायचे. 2008 मध्ये आम्ही संसार चालवताना हिशोब लावायचो. आताच्या घडीला पती गजानन काळे यांनी बेहिशेबी मालमत्ता कमावली आहे, असे संजीवनी काळे यांनी म्हटले आहे.

गजानन काळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी मिळून भ्रष्टाचार केला आहे. मनसे पक्षातील पदाच्या जोरावर त्यांनी हे सगळे केले आहे. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. फक्त ते पत्र अजून त्यांना पाठवलेले नाही. मनसेचे संदीप देशपांडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. पती गजानन यांच्याबरोबर याबाबत भांडणे व्हायची, त्यावेळी प्रत्येक भांडणात मैत्रीकुल संस्थेचे अध्यक्ष किशोर जगताप मध्यस्थी करायचे. राजकारणी चेहरा हा वेगळा असतो. गजानन काळेंच्या सर्व कारभाराला त्या दोन महिला पत्रकारसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत, असेही संजीवनी काळे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय! अजित पवारांचा फडणवीसांना दणका

News Desk

“सरकारच्या गुंड आणि झुंडशाहीला आम्ही घाबरणार नाही”, फडणवीसांचा ‘मविआ’ला इशारा

Aprna

माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही? उदयनराजेंचा भुजबळांना सवाल  

News Desk