HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास, लातूरवर पाणीटंचाईचे संकट

मुंबई | पुढच्या तीन-चार दिवसात मान्सून राज्यातून रजा घेणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झालेला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील मुंबईसह राज्यात कुठेच समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून ऐन रब्बीच्या तोंडावर राज्यात रासायनिक खाते महागल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. रासायनिक खतांच्या गोण्या १०० ते २५० रुपयांनी महागल्या आहेत.

मांजरा धरणातील पाणीसाठा संपला, लातूर शहरावर पाणीटंचाईचे संकट

दोन वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी विविध ठिकाणांहून रेल्वेने पाणी आणावे लागले होते. लातूर शहरावर आता पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातला पाणीसाठा संपला असून त्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

लातूर जिल्ह्यात यावर्षी आवश्यकतेपेक्षा कमी पाऊस पडल्याने अनेक ठिकाणचा पाणी साठा कमी झाला आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणात सुद्धा अत्यल्प जलसाठा उरला असून, अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मांजरा धरणातल्या मृत पाणीसाठ्यावर लातूरकरांची तहान भागवली जात आहे. सध्या लातूर शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकीय हेतूने ईडी, सीबीआयचा वापर”, हसन मुश्रीफांचा भाजपवर गंभीर आरोप

News Desk

ती दहा मते कोणाची

News Desk

“चिक्की घोटाळ्यात गुन्हे दाखल केले पाहिजे, ही माझी सुरुवातीपासूनची मागणी”

News Desk