HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाही – रोहित पवार  

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी राज्य सरकारच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासन अंशत: लॉकडाऊनचा विचार करत आहे. नागपूरसारख्या ठिकाणी तर कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनच्या या निर्णयाला स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांकडून विरोध होताना दिसतोय. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याचं म्हटलं आहे.

‘लॉकडाऊनच्या भितीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय नसून लसीकरणाबरोबर लोकांनी कटिबध्दपणे नियमांचे पालन करणं गरजेचं आहे, लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाही,असं मला वाटतं’, असं रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

आपल्या ट्वीटमधून रोहित पवार यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाला थेट विरोध केला नसला तरी त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सर्व घटक म्हणजे व्यापारी, व्यावसायिकांमध्ये संभ्रमाची भावना असल्याचं म्हटलंय. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनीच आता काटेकोरपणे नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं रोहित पवार म्हणालेत. तसंच लॉकडाऊन राज्यासह सर्वसामान्य जनतेलाही पूरक ठरणार नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रंथालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा आदेश; मेट्रो देखील १५ऑक्टोबरपासून सुरु होणार  

News Desk

राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

News Desk

परीक्षा न देता जो माणूस मुख्यमंत्री झाला, ‘त्या’ माणसाने निर्णय घेणे काही नवल नाही !

News Desk