HW News Marathi
महाराष्ट्र

१ महिन्यातच सरकार पडेल असे विरोधक सांगत होते, मात्र बोलतां बोलतां ५ वर्ष कधी पूर्ण होतील भाजपला कळणार पण नाही

अहमदनगर | राज्यात कोरोनाचे संकट तर आहेच. मात्र, महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप, टोलेबाजी सुरुच आहे. महाविकास आघाडीचे सरकार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे, या सरकारमध्ये सुसंवाद नाही आहे, अशी टिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

“महाविकास आघाडीचे सरकार जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेल तर जम्मू काश्मिरमध्ये त्यांनी पीडीपी सोबत जो घरोबा केला होता, ते नातं कोणतं होतं? त्याला जबाबदार कोण ? ते की त्यांचे वरिष्ठ नेते? आणि या सोबत ते वरिष्ठ नेत्यांना प्रश्न विचारु शकले का?”, असे प्रत्यूत्तर रोहित पवारांनी दिले.

तसेच, “बोलता बोलता सरकारचे ५ वर्ष कधी पूर्ण होतील हे भाजपला कळणार पण नाही. सरकार स्थापन झाल्यावर १ महिन्यात कोसळेल असे विरोधक सांगत होते. मात्र, आता ६ महिने झाले आहेत, बोलतां बोलतां ५ वर्षे कधी पुर्ण होतील हे भाजपला समजणारही नाही”, असा खोचक टोला रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पायदळी !

News Desk

‘पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरुद्ध लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल!’

News Desk

मी काँग्रेसमध्ये, त्यांनी त्यांच्या पक्षाबाबत बोलावं, साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

News Desk