HW News Marathi
महाराष्ट्र

वाढीव वीजबिलाबाबत राज्य सरकारने अभ्यास करावा, रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

सोलापूर | औरंगाबादच्या नामांतरावरुन राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, मात्र रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं रोहित पवार म्हणाले. थकित वीज बिलाच्या कारवाईबाबतही रोहित पवारांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे.

“औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मी माझं व्यक्तिगत मत अनेक वेळा मांडलं आहे. एखाद्या शहराचं, गावाचं नाव बदलायचं असेल, तर त्या गावातील लोकांनाही विश्वासात घ्यावं. लोकशाही पद्धतीने किंवा अन्य माध्यमातून त्यांचं मत जाणून घेतलं, तर जो काय निकाल येईल, त्या निकालाला ताकद देण्याची जबाबदारी सरकारची असेल” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवारांनी राज्य सरकारलाही घरचा आहेर दिला. थकित वीज बिलाच्या कारवाईबाबत रोहित पवारांनी काही सवाल उपस्थित केले. वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वाढीव वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला, तेवढेच बिल द्यावे. यासाठी सरसकट धोरण करता येईल का, याचा अभ्यास राज्य सरकारने करावा, असंही रोहित पवारांनी सुचवलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार,धनंजय मुंडे,जयंत पाटलांसह बड्या नेत्यांना पोलिसांनी का पाठवली नोटीस?

News Desk

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही ! उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

News Desk

कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? – आशिष शेलार

News Desk