HW News Marathi
देश / विदेश

‘पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत’, रोहित पवारांनी केले मोदींचे कौतुक

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आहे. गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ सदस्यांना काल (९ फेब्रुवारी) सभागृहात निरोप देण्यात आला होता. दरम्यान गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना सभागृहातील सदस्यांनी उजाळा दिला. विशेष म्हणजे गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पाहायलामिळालं. गुलाम नबी आझाद यांच्याबद्दलचा आठवणींना उजाळा देताना मोदींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. दरम्यान मोदींचं हे भावूक रुप पाहून मोदींना टोला मारणाऱ्या रोहीत पवारांनी कौतुक केलं आहे.

आमदार रोहित पवार ट्विट करत म्हणाले आहेत की, “राज्यसभेत विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब भावूक झाल्याचं पहायला मिळालं. ‘पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत’, या भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेला मार्गावरून मोदीजींना चालताना पाहून आनंद वाटला”.

मोदी काल राज्यसभेत काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना दहशतवादी हल्ल्याच्या घटनेची आठवण सांगितली. “जेव्हा आपण (गुलाम नबी आझाद) मुख्यमंत्री होता. मी पण एका राज्याचा मुख्यमंत्री (गुजरात) म्हणून काम करत होतो. आपले जवळचे संबंध होते. एकदा गुजरातच्या यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जवळपास आठ लोक मारले गेले होते. त्यावेळी मला गुलाम नबी यांचा सर्वात आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांना मृतदेह आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

त्यांनी व्यवस्था करतो असं सांगितलं. त्यानंतर रात्रीही ते विमानतळावर होते. गुलाम नबी यांनी विमानतळावरून पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच चिंता ते करत होते. पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे,” असं म्हणताना मोदींना अश्रू आवरता आले नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर भारतातील महापुरामुळे जनजीवन विस्कळीत

News Desk

वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत  समान वाटा, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

#COVID19 : देशातील ‘या’ राज्यात ‘लॉकडाऊन’ ३० एप्रिलपर्यंत वाढवला

News Desk