HW News Marathi
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा – रोहित पवार

पुणे | राज्यात सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत मतांमध्ये भिन्नता आहे. युजीसी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या असे सांगत आहेत. मात्र, राज्यात सध्या कोरोनाची स्थिती गंभीर असल्यामुळे मुलांच्या जीवाशी खेळत परीक्षा घेणे योग्य नसल्याचे वारंवार सरकारकडून सांगण्यात येत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युजीसीला परीक्षांवरून विनंती केली आहे.

‘कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींगा घेणाऱ्या यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तसेच, ‘कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा’, अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मालाड इमारत दुर्घटना | मुख्यमंत्र्यांची मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला ५ लाखांची मदत जाहीर 

News Desk

अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव, १० जणांचा होरपळून मृत्यू

News Desk

अमृता फडणवीसांना ‘मुंबई असुरक्षित वाटते ‘तर सुप्रिया सुळेंना ‘मुंबई पोलिसांमुळे मुंबई सुरक्षित’ वाटते !

News Desk