HW News Marathi
Covid-19

फडणवीसांनी जर माझं ऐकलं असतं तर आज …! मुख्यमंत्रीपदावरून आठवलेंनी ऐकवले

मुंबई । कोरोनायोद्ध्यांना सन्मानित करण्यासाठी मुंबईत ‘सन्मान देवदूतांचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज (४ जुलै) मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. त्यामुळेअर्थात या कार्यक्रमात राजकीय शेरेबाजी पाहायला मिळाली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अखेर आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवलीच. फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर मिश्किलपणे भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, “‘देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी जर माझं ऐकलं असतं तर आज ते मुख्यमंत्री असते.” त्यामुळे रामदास आठवलेंच्या या खुलाशाची राज्यात जोरदार चर्चा आहे.

…तर आज फडणवीस मुख्यमंत्री असते !

रामदास आठवले म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपची ताटातूट झाली. पुढे शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आपला नवा संसार थाटला. याच सत्तासंघर्षाच्या काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की, शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देऊन टाका. त्यावेळीच माझं म्हणणं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर आज ते मुख्यमंत्री असते”, असा खुलासा रामदास आठवले यांनी केला. इतकेच नव्हे तर पुढे रामदास आठवले यांनी पुढे असेही सांगितले की, “तुमच्या दोघांच्यात (उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस) एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा असेही मी त्यावेळी सांगितले होते.”,

‘सन्मान देवदूतांचा’ या विशेष कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे नेते उपस्थित होते. यावेळी रामदास आठवलेंनी चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. रामदास आठवले यांनी एकीकडे फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर मिश्किलपणे भाष्य केले तर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आपल्या खास शैलीत कौतुकही केले आहे.

कोरोनाला गो म्हणता म्हणता कोरोना माझ्या पाठी लागला…! । आठवलेंची स्पेशल कविता

कोरोना पेशंट होतो मी सुद्धा,

पण आपण आहात कोरोना योद्धा…

वंदन करतो शिवाजी महाराज, आंबेडकर आणि गौतम बुद्धा….

कारण माझ्या मनात आहे तुमच्याबद्दल श्रद्धा…

जसं घरघर चालत असतं जातं,

तसंच असतं माणुसकीचं नातं…

जसं बँकेत असतं आपलं खातं…

तसं नसतं माणुसकीचं नातं…

कोरोनाने साऱ्या जगाला नाचवले

पण डॉक्टरांनी लाखो रुग्णांना वाचवले…

अनेक पेशंटला मी हॉस्पिटल मध्ये पाठवले

तेव्हा बॉम्बे हॉस्पिटलचे दिवस मला आठवले…

आणि मी आहे रामदास आठवले…

मी दिला होता गो कोरोना गो चा नारा,

कोरोनाला गो म्हणता म्हणता कोरोना माझ्या पाठी लागला…!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ७९० नवीन रुग्णांचे निदान, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली

News Desk

कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करा-अजित पवार

News Desk

MPSC परिक्षा कधी होणार ? मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

News Desk