HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी रासप नेते रत्नाकर गुट्टेंना अटक

परभणी | गंगाखेड शुगर्सचे चेअरमन आणि रासप नेते रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आज (२६ मार्च) अटक करण्यात आली आहे. गंगाखेड सत्र न्यायालयाने गुट्टे यांना जामीन देखील फेटाळला असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी केली आहे. गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्या स्थापन करुन २६ हजार शेतकऱ्यांना व बँकांना कोट्यावधी रुपयांना फसवले होते.

गुट्टे यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण २२ कंपन्याची नोंद असून त्यापैकी अधिक कंपन्या या कागदावर होत्या. रत्नाकर गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अखेर दोन वर्षांनी त्यांना अटक झाली. गुट्टे यांनी त्यांच्या विविध कंपन्यांवर शून्य उलाढाल असतानाही बनावट कागदपत्रे तयार करुन सुमारे साडेतीन ते साडेपाच हजार कोटी रुपयांची कर्जे घेतली असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर ही कारवाई झाली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना मोक्का लावा, अँड. आशिष शेलार यांची मागणी

swarit

विधानभवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई व्हावी !

News Desk

“तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो”, पुण्यात संभाजीराजे आक्रमक!

News Desk