HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मदतीसाठी एक दिवसाचा पगार द्या, सरकारचं कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई – आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार देण्याचं आवाहन केलंय. त्यासाठी जुलै महिन्यातील एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावं, असं आवाहन राज्य सरकारनं परिपत्रकाद्वारे केलंय.

दुष्काळामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण होण्यासाठी राज्य सरकारने निधी उभारण्याचं नियोजन केलं आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, महामंडळ यातील अधिकारी, कर्मचारी, तसेच आयएएस, आयपीएस, फॉरेस्ट ऑफिसर हे क्लास वन वर्गातील अधिकारी देखील जुलै -2017 च्या वेतनातील एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी देणार आहेत.

मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनाही जुलै महिन्यातील एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान याबाबत सक्ती करण्यात आलेली नसून हा विषय ऐच्छिक असल्याचंही परिपत्रकात म्हटलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे शिक्षक मतदार संघाच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचे जयंत आसगांवकर आघाडीवर!

News Desk

२०२४ नंतर जे घडेल ना…! – राऊतांचा भाजपला मोठा इशारा

Aprna

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna