HW News Marathi
देश / विदेश

मनसेप्रमुखांना तळीरामांच्या कोरड्या घश्याची चिंता, ‘सामना’तून बोचरी टीका

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून राज्याच्या महसूलवाढीसाठीचा उपाय सुचवला होता. महाराष्ट्राचे रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी, तसेच राज्याच्या महसूलवाढीसाठी मद्यविक्रीला सुरुवात करावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. मात्र, या मागणीनंतर आज (एप्रिल २५) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून राज ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या अग्रलेखात राज ठाकरेंचा फोटोही लावण्यात आला आहे. “राज ठाकरेंनी ही जी रंगीत संगीत मागणी केली, त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना ? की तळीरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली ?”, असा बोचरा सवाल सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे.

महसूलवाढीसाठी मद्यविक्री सुरु करावी या राज ठाकरेंच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळातूनही अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र, आता थेट शिवसेनेच्या मुखपत्रातूनच राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. “वाईन, डाईन आणि फाईन…व्वा ! राज बाबू !!” अशा शीर्षकाखाली आज सामनाच अग्रलेख लिहिण्यात आला आहे. अग्रलेखामध्ये शायऱ्या आणि कवितांचाही समावेश करत शेवटी पुन्हा एकदा राज ठाकरेंना टोला लागवण्यात आला आहे. “राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर,” असा हा अग्रलेखाचा समावेश करण्यात आला आहे. आता राज ठाकरे ‘सामना’च्या या टीकेला प्रत्युत्तर देणार का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला

Gauri Tilekar

पाकिस्तानच्या आमंत्रणाला सुषमा स्वराज यांचा नकार  

News Desk

मरीना बीचवरील अंत्यसंस्काराचा नेमका वाद काय ?

swarit