HW News Marathi
देश / विदेश

लॉकडाऊनच्या गोंधळात देश गटंगळ्या खात आहे, सामनातून केंद्रावर टीका

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देशासमोर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक संकटावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला फक्त चार तासांच्या मुदतीवर कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता. त्या गोंधळाच्या गर्तेत देश गटंगळ्या खात आहे, कसे व्हायचे, असा टोला सामनामधून मोदी सरकारला लगावण्यात आला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

देशावर आर्थिक संकट कोसळले आहे आणि केंद्र सरकारने सरळसरळ हात झटकले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याराज्यात जे संकट निर्माण झाले आहे, ते मुख्यत्वेकरून कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे आहे. अशा परिस्थितीत केंद्राने राज्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात अशी मदत गुजरातला केली होती. केंद्राकडे स्वत:ची महसुली उत्पन्नाची साधने कमी आहेत. राज्यांनी दिलेल्या महसुलावर केंद्राचे दुकान चालते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री, नोकरशाही, संसद, खासगी सुरक्षा, संरक्षण, परराष्ट्र व्यवहारावर होणारा अचाट खर्च हा या मार्गाने होते.

काही राज्ये केंद्राला जास्त महसूल देतात. तर काही राज्ये कायम हाती कटोरा घेऊन दिल्लीत उभी राहतात. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब, गुजरात प. बंगाल, आंध्रने स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून केंद्राला भक्कम केले आहे. केंद्राच्या तिजोरीत किमान २२ टक्के रक्कम एकट्या मुंबईतून जाते. पण आज महाराष्ट्र आणि इतर राज्यांना मदत करायला केंद्र सरकार तयार नाही. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेशला कोरोनाचा जास्त फटका बसला आहे. ही पाच राज्येच देशाच्या जीडीपीमध्ये ४५ टक्के वाटा उचलतात. मात्र कोरोनाचा प्रकोप आणि लॉकडाऊनमुळे पाच राज्यांना १४.४ लाख कोटींचा फटका बसला आहे. पाच राज्यांत ही स्थिती असेल, तर संपूर्ण देशात किती नुकसान झाले असेल, ते आकडे धक्कादायक ठरतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या वर्षी मान्सूनचा प्रवास वेळेत, अंदमानात मान्सून दाखल

News Desk

#Coronavirus : संसदेत वित्त विधेयक मंजुरीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले

swarit

कोकणात मदतीसाठी ‘नेव्ही रेस्क्यू फोर्सची’ आवश्यकता, सुप्रिया सुळेंची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

News Desk