HW News Marathi
महाराष्ट्र

अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरवले !

मुंबई । शिवसेनेने आपले मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून आज (२२ सप्टेंबर) पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतवर तोंडसुख घेतले आहे. विरोधकांच्या अभूतपूर्व गोंधळात राज्यसभेत मंजूर झालेल्या मोदी सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात आंदोलने करणाऱ्या शेतकऱ्यांना अभिनेत्री कंगणा राणावतने ‘दहशतवादी’ संबोधल्याचे म्हणत शिवसेनेने सामनातून तिला समर्थन देणाऱ्या भाजपवर जोरदार टीका केली आहे.

“देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरवले. किसानांचा हा अपमान, सिमेवरील जवानांचा तसेच स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या लाखो कष्टकऱ्यांचा अवमान आहे. त्या अवमानावरती नटीच्या प्रेमाखातर कोणी फुले उधळत असतील तरी इतिहास त्यांना माफ करणार नाही”, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, “आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर सरकारनं नवं कृषी विधेयक अतिरेक्यांसाठी आणलं असं मानायचं का ?”, असा सवाल शिवसेनेनं केलाय.

“आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत, असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत.आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय? किसानांचा अवमान हा सीमेवरील जवानांचाही अवमान आहे. स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या लाखो कष्टकऱ्यांचा अवमान आहे. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारविरोधी उभ्या ठाकलेल्या बार्डेली सत्याग्रहातील शेतकऱ्यांचा अवमान आहे”, असे म्हणत शिवसेनेने भाजपला धारेवर धरले.

“राष्ट्रवादाची, राष्ट्रभक्तीची नवी व्याख्या बनवून कोणी भारतीय राज्यघटनेच्या पुस्तकात चिकटवली असेल तर तसं लाल किल्ल्यावरून एकदा जाहीर करा”, असा उपरोधिक टोलाही ‘सामना’तून पंतप्रधान मोदींना लगावण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज  3,530 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 52 जणांचा मृत्यू!

News Desk

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

News Desk

“कोरोना रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांची जबाबदारी आता संचालकांची”, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk