HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपात ‘संघजिहाद’ पद्धत सुरु झाली आहे का ? | सचिन सावंत

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करतान पकडले गेले तर काहीजण पाकिस्तानी आयएसआयचे एजंट निघाले हेही आपल्यासमोर असताना भाजपाची प्रगती त्याच्याही पुढे झाली असून उत्तर मुंबई भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांग्लादेशी नागरिक रुबेल शेख निघाला. भाजपात ‘संघजिहाद’ ही नवीन पद्धत सुरु झाली आहे का आणि सीएए कायद्यात भाजपासाठी काही वेगळे प्रावधान केले आहे का? याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज (१९ फेब्रुवारी) केली आहे.

सचिन सावंत याबाबत बोलताना पुढे म्हणाले की, “मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिक रुबेल शेखला पक्ष पदाधिकारी पदावर नियुक्ती केली जाते आणि दुसरीकडे सीएए कायद्याचा धाक दाखवला जात आहे. भाजपाचे हे वागणे म्हणजे देश पातळीवर वेगळा न्याय आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय असे दिसते. भाजपात तर वाल्याचा वाल्मिकी होतो. ही नवीन पद्धती भाजपाने सुरु केली आहे काय ?याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे”, असे सवाल सावंत यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हनुमान चालिसा’मुळे राजद्रोहाचा गुन्हा, तर आम्ही रोज म्हणू, फडणवीसांचे राज्य सरकारला आवाहन

Aprna

“ती काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती”, राऊतांची मिश्लिल टिप्पणी  

News Desk

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर काय म्हणाले छगन भुजबळ? 

News Desk