HW News Marathi
महाराष्ट्र

पाच वर्षे सत्तेत असताना भाजप विटीदांडू खेळत होते का?

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यावर लिहिलेल्या पुस्तकावरुन वाद सुरु आहेत. या पुस्तकात २६ /११च्या हल्ल्याबाबत काही वादग्रस्त खुलासे करण्यात आले आहेत. या खुलाश्यांच्या आधारावर भाजपकडून या हल्ल्याच्या फेरचौकशीची मागणी करण्यात आली. याच मागणीवरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधत त्यांना खोचक टोला लगावला आहे.

‘दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी वकिलांवर दबाव आणणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी देणाऱ्या भाजपने २६/ ११ च्या हल्ल्याबाबतची फेरचौकशीची मागणी करणे, म्हणजे हास्यास्पद आहे. या मागणीशिवाय दुसरी कोणतीही मागणी असू शकत नाही. तर गेली पाच वर्षे सत्तेत असताना भाजप विटीदांडू खेळत होते का? असा खोचक टोला सावंत यांनी भाजपला लगावला आहे. तसेच राकेश मारिया यांनी पुस्तकात ज्या बाबी नमूद केल्या आहेत त्याच बाबी अजमल कसाबच्या चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. खोटा प्रचार करताना भाजपला लाज वाटली पाहिजे. भाजपने न्यायव्यवस्था, शहिदांचा आणि प्रमाणिकपणे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही ही मागणी करत अपमान केला आहे,’ असा आरोपही सावंत यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरेतील वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk

हिंदुस्थानी भाऊचं ‘ते’ चिथावणीखोर वक्तव्य नेमकं काय?

News Desk

राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप

News Desk