HW News Marathi
महाराष्ट्र

विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय, ईडीच्या छाप्यावरुन कॉंग्रेसची प्रतिक्रिया 

मुंबई | महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीच्या पथकाने आज (२४ नोव्हेंबर) सकाळीच धाडसत्र सुरु केलं आहे. यावर राजकीय वर्तृळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर आघाडी सरकारमधील कॉंग्रेस पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या ६ वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल कॉंग्रेसने केला आहे. ईडीने टाकलेला छाप्यापाठीमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे.

“विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतं आहे. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?”, असे सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

” भाजप हीन पातळीचं राजकारण करणारा पक्ष आहे. लोकांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. ज्यांना निवडून दिलंय ते लोकशाहीवर घाला घालत आहेत. द्वेष बुद्धीने छापे टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. गेल्या ६ वर्षात एकाही भाजप नेत्यावर ईडीने छापा का टाकला नाही? त्यांना का नोटीस नाही?”, असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले आहे.

“सुशांतप्रकरणात ईडी कशी आली? त्याचा पैसा चोरीचा, मनी लाँड्रिंगचा होता का? भाजपचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजप जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करुन भाजपमध्ये प्रवेश दिले”, अशी टीका सावंत यांनी केली आहे.“भाजपचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे आहेत. त्यांचा डोळा सत्तेकडे लागला आहे. या सगळ्या धाडी आणि छापेमारी सगळं चाललं आहे ते सत्तेसाठी आहे. देशात सर्वत्र अशा धाडी टाकल्या, तोच पॅटर्न महाराष्ट्रात वापरत आहे”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

किरिट सोमय्यांची प्रतिक्रिया

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा चुकीच्या मार्गाने मालमत्ता जमवली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले. मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे काही नेते मग ते मुंबईतील असो की इतर ठिकाणचे महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हप्ते घेतात, अशा लोकांवर कारवाई करायला नको का?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही थेट हल्ला केला. शिवसेनेचे मुखियाही अशाच प्रकारचे उद्योग-धंदे करतात, हे सर्वांनाच माहीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकर ३ महिन्यांच्या सुट्टीवर!

News Desk

‘सरकारने MPSC सदस्यांची यादी पाठवलीय,आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल हा विश्वास’, रोहित पवारांचा राज्यपालांना टोला!

News Desk

नागरिकांकडे राशन कार्ड नसेल तर आधार कार्ड ग्राह्य धरावे, फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी

swarit