HW News Marathi
महाराष्ट्र

अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील, सचिन सावंतांचा दानवेंना पलटवार

मुंबई | “महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,” असे विधान केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी विरोधात केले होते. त्यांच्या या टीकेनंतर त्यांना अनेकांनी प्रत्युत्तर दिले आहे. “अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील” अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

“महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,” असं विधान केंद्रीय कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केलं होतं. दानवे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. “अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील” असं म्हणत सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

 

“महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,” असं दानवे म्हणाले होते. तसंच बोलताना त्यांनी कृषी कायद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला होता. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांमुळे छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार असल्यानेच काँग्रेस या विधेयकांना विरोध करत असल्याचं ते म्हणाले होते.

गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले होते?

“रावसाहेब दानवे म्हणाले महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि करोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी,” असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवेंवर निशाणा साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाऊद ईब्राहीमकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमकी ?मातोश्रीची सुरक्षितता वाढवली !

News Desk

आता तरी राज्यातील चाचण्या वाढवा, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती

News Desk

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिवकुमारला २ दिवस पोलीस कोठडी

News Desk