HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार कधी क्रिरेट खेळले तरी ते क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत ना? सदाभाऊंचा निशाणा

सातारा | पॉप गायका रिहानाच्या व्टीटवरून सचिन तेंडूलकरवर शरद पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना सदाभाऊ खोत यांनी आज शरद पवारांवर घाणाघाती टीका केली. ते म्हणाले, शरद पवार साहेब हे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी क्रिकेट खेळले, कधी बॉलिंग केली, बॅटिंग केली. तरी ते अध्यक्ष झाले. दुसऱ्या बाजूला ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी लंगुटा घालून कुस्त्या खेळल्या, किस्ताक घातले, मला तरी कधी दिसले नाही. जुन्या लोकांनाही मी विचारले पवार साहेब कधी हिंद केसरी झाले होते, त्यांनी नाही म्हणून सांगितले, असा घाणाघाती टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केली आहे.

दरम्यान, मी सोडून बाकीच्यांना काहीही कळत नाही, ही पध्दत महाराष्ट्रात दृढ होत असून दिर्घ काळाच्या अनुभवनातून सगळा काही मलाच मिळाले पाहिजे ही मानसिकता या महाराष्ट्रात निर्माण होत आहे. ही नवनेतृत्वाला हानीकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सदाभाऊ खोत यांनी आज येथील शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

पॉप गायिका रिहानाने केलेल्या व्‍टीटवरून उठलेल्या व्टीट युध्दावर सडकून टीका केली. सदाभाऊ खोत म्हणाले, रिहाना या पॉप गायिकेने काहीतरी व्टीट केले होते. हिंदूस्थानच्या शेतकऱ्यांचा तिला मोठा कळवळा आला होता. ती ज्या खंडात राहते, तेथे अनेक लोक राहतात, त्याविषयी तीने कधी व्टीट केले नाही. आमच्यातील काही लोकांनी तिच्या व्टीटवर आपले ट्विट करत पंतप्रधानांवर आरोप केले. मुळात आमचे पंतप्रधान शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सक्षम आहेत.

“सचिन तेंडूलकरांनी केलेल्या व्‍टीटवर पवार साहेब म्हणाले होते, त्यांना ज्या क्षेत्रातील कळते त्याने त्याच विषयावर बोलावे. यावर मला थोडे हसू आले, असे सांगून सदाभाऊ म्हणाले, मी म्हटलं की सचिनला शेतीतलं काहीही कळत नाही. पण पवार साहेब क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी क्रिकेट खेळले, कधी बॉलिंग केली, बॅटींग केली. तरी ते अध्यक्ष झालेच ना. दुसऱ्या बाजूला ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी केव्हा लंगुटा घालून कुस्त्या खेळल्या होत्या”.

“केव्हा किस्ताक घातले. मला तरी कधी दिसला नाही. मी जुन्या जाणत्या अनुभवी लोकांनाही विचारले, पवार साहेब कधी हिंद केसरी झाले होते का, त्यावर त्यांनी नाही म्हणून सांगितले. ठिक आहे, लहानपणी ते नारळावरील कुस्त्या खेळले असतील. आम्ही सुध्दा खेळत होतो. मी सोडून बाकीच्यांना काहीही कळत नाही, ही पध्दत महाराष्ट्रात दृढ होत असून दीर्घ काळाच्या अनुभवनातून सगळ काही मलाच मिळाले पाहिजे. ही मानसिकता या महाराष्ट्रात निर्माण होत आहे. ही नवनेतृत्वाला हानीकारक आहे”, असे ही सदाभाऊंनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीने आज मुंबईत येस बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले

News Desk

कोरोनाचा काळ संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र दौरा, पंकजा मुंडेंचा एल्गार

News Desk

त्रिपुरा हिंसाचारांचं अमरावतीत तीव्र पडसाद; बंदला हिंसक वळण, तणावाचं वातावरण

News Desk