HW News Marathi
देश / विदेश

संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात, पण अनेकजण आदळआपट करतायत !

मुंबई । महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट सध्या घोंगावत आहे. या संकटामध्ये आपल्या जनतेची आणि राज्याची काळजी घ्यायची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमध्ये खरा नेता तोच आहे जो समाजाचे रक्षण करतो आणि जनतेच्या आरोग्याची काळजी घेतो. गर्दी करुन संकट घरोघरी पोहोचवण हे खऱ्या नेत्याचे लक्ष नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धवा ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने शनिवारी चक्काजाम आंदोलन केलं आहे. या आंदोलनात राज्यभरात लाखो लोकांनी सहभाग घेतला होता. सरकार आपलं ऐकते आहे. ते जर ऐकत नसते, तर संघर्षासाठी तुमच्यासोबत मीच उतरलो असतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांना टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने आज (२६जूनला) केलेल्या चक्काजाम आंदोलनावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. या सारथीच्या ऑनलाइन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी नाती ओढूनताणून पुढे नेता येत नाहीत, असं विधान केलं.

मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकार करेल !

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणारा आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री अमित शाहांची भेट घेणार

Aprna

… तर फटाक्यांची माळच लागेल !, मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत राज ठाकरेंचा इशारा

News Desk

निवडणुकांच्या तोंडावर कन्नडींगांचे भाषाप्रेम जागे

News Desk