HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा नाही झाली तर काय होईल हे सांगायची गरज नाही, संभाजीराजेंचा सूचक इशारा

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी काल (१६ जून) मोर्चा काढल्यानंतर खासदार संभाजी छत्रपती आज (१७ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पाच मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. मात्र, भेट सकारात्मक न झाल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही, असा सूचक इशाराच संभाजी छत्रपती यांनी बैठकीपूर्वी दिला आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, या आधीही संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत काही उपाय सांगितले होते.

संभाजी छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाच मागण्या दिल्या आहेत. मूक आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं. त्याचं मी स्वागत करतो. चर्चा सकारात्मक होईल याची अपेक्षा आहे. मात्र, चर्चा झाली नाही तर काय होईल हे मला सांगायची गरज नाही, असा सूचक इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

समन्वयकांसोबत बैठक नाही

मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक होत आहे. पण आज ऐवजी उद्या भेट व्हावी अशी समन्वयकांची भूमिका होती. पण मुख्यमंत्र्यांचा आजच बैठक घेण्यासाठी आग्रह होता. त्यामुळे आज संध्याकाळी ही बैठक होत आहे. भेटी आधी समन्वयकांशी कोणतीही बैठक होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्दव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्या आजच्या या बैठकीकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

तर घटना दुरुस्ती होऊ शकते

सरकारशी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होत असली तरी आरक्षणासाठीचा लढा कायम राहणार आहे. हा लढा सुरू असतानाच राज्य सरकारने त्यांच्या हातात ज्या गोष्टी आहेत. त्या मार्गी लावाव्यात, असं सांगातनाच केंद्र सरकारवर माझे प्रयत्न आधीपासून सुरू आहेत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने दिल्लीत अनेकांना पत्रं दिलि आहेत. समाजाचं हित होणार असेल तर घटना दुरुस्तीही केली जाऊ शकते, असंही ते म्हणाले.

तर विजयोत्सव साजरा करू

राज्य सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं असलं तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे, असं सांगतानाच सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यास नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून साजरा करू, असं संभाजीराजे यांनी कालच स्पष्ट केलं होतं. तर, “मला उपमुख्यमंत्री अजित पवार भेटून गेले. त्यांनी मागण्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. घटनेत आतापर्यंत अनेक अमेण्टमेंट झाल्या. आता अजून एक करायला काय हरकत आहे? पंतप्रधानांसमोर आणखी एकदा हा विषय गेला पाहिजे. पंतप्रधानाचे विचार काय ते स्पष्ट झाले नाहीत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे”, अशी मागणी असं खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बाकी सगळं स्मरणात येतं मग आमदारांच्या यादीचं विस्मरण होतं?”, राऊतांचा राज्यपालांना चिमटा

News Desk

भाजपने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली त्यामुळे भाजपने तात्काळ माफी मागावी – सचिन सावंत

News Desk

‘माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’- बच्चू कडू

News Desk