HW News Marathi
महाराष्ट्र

“बाकी सगळं स्मरणात येतं मग आमदारांच्या यादीचं विस्मरण होतं?”, राऊतांचा राज्यपालांना चिमटा

नवी दिल्ली। राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आणि या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना काही गोष्टींचं स्मरण करून दिलं. आता याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीची आठवण त्यांनी करुन दिली आहे. राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हा प्रश्न उपस्थित केलाय. राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय? आम्हीही त्यांना १२ आमदारांच्या यादीचे स्मरण करून देत आहोत. यादी तुमच्याकडे पडली आहे त्या वर सही करा. त्याचे विस्मरण का होत आहे हे लक्षात येत नाही ? बाकी सगळं स्मरणात येते यादीचे मात्र विस्मरण होते, अशी खोचक टिका राऊत यांनी केली आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात काय लिहिले?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून त्यांचं ओबीसी आरक्षणासह इतर गोष्टींवर लक्षं वेधलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ २३ जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा, असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महाराष्ट्राची होती…आहे…आणि राहिल – अजित पवार

News Desk

रितेश- जेनेलियाचा मरणोत्तर अवयव दानाचा निर्णय

News Desk

चांदाचे एकलव्य एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा चढवतील

News Desk