HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी मी ६ जूनला भूमिका घेण्यापूर्वी समाजाचे ५ प्रश्न मार्गी लावावेत, संभाजीराजेंचा इशारा

सिंधुदुर्ग | खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (३१मे) सिंधुदुर्ग दौरा केला. यावेळी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना नाव न घेता खासदार संभाजीराजे यांना असं म्हटलं होतं की, कोरोना योद्धे म्हणून समोर या, यावर खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पलटवार केला आहे. यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणालेत कि, “मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला असेल परंतु त्यांना हे देखील माहिती आहे कि ५ मे ला सर्वोच्च न्यायालयाचा मराठा समाजाच्या विरोधात जो निकाल आला त्यावेळीच महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन मी केले होते. त्यामुळे मराठा बांधवांच्या भावनांचा उद्रेक झाला नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी कौतुकही केलं होतं. आज त्यांनी सल्ला दिला की मी कोरोनाचा योद्धा होऊन बाहेर पडावं, पण मी सुरुवातीपासूनच समाजाचा योद्धा आहे”.

कोरोनाचा योद्धा बनून मी बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर…. – संभाजीराजे

“कोरोनाचा योद्धा बनून मी बाहेर पडाव असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर समाजाचे पाच प्रश्न मी मांडले आहेत. ते त्यांनी ६ जूनला मी भूमिका घेण्यापूर्वी मार्गी लावावेत असेही खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटले आहे. तर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे देखील या प्रश्नातून मार्ग काढतील असा विश्वास आहे असेही ते यावेळी म्हणाले. समाजाला न्याय देण्याची भूमिका या सरकारने घ्यावी मराठा समाजाच्या प्रश्नामध्ये राजकारण आणू नये”, अशी प्रामाणिक भूमिका असल्याचेही यावेळी संभाजी राजे छत्रपती म्हणाले आहेत.

संभाजीराजे यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

* मी खासदार झाल्यापासून जी कामे कधीही झाली नाहीत ती कामे केली

* पवारसाहेब म्हणाले की त्यांनाही हे मुद्दे पटलेले आहेत. सर्वपक्षीय बैठकीत पवारांनीही यावे हे माझे आमंत्रण

* दोन्ही सरकारांमुळे समाजाचे नुकसान.

* माझा कोण वापर करून घेणार ? मी छत्रपतींच्या घरात जन्मलोय (प्रश्न : शिवसेना तुमचा वापर करून घेतेय का? )

* राणेंचे ठिके ते माजी मुख्यमंत्री आहेत. मी त्यांनाही भेटणार होते पण शक्य झाले नाही

* मराठा समाजासाठीविशेष समिती स्थापन करा ना, आमच्यासारख्या लोकांना घ्या ना

* ओबीसीप्रमाणे मराठ्यांनाही शैक्षणिक सवलती द्या ना

* 6 जून शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. 6 जूनपर्यंत निकाल लागला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरूनच जाहीर होणार.

* शिवाजी महाराज इथे असले असते तर त्यांनी आपल्या मावळ्यांना असे टाकले असते का ?

* 6 जूनपर्यंत तुम्ही भूमिका घेतली नाही तर त्यानंतर कोविडवैगरे काही मागेपुढे बघणार नाही. आम्ही सगळे जण असू. आम्हाला वेठीस धरू

* सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला,आम्ही दुःखी झालो पण मी सामोपचाराची भूमिका घेतली. कोरोना काळात उद्रेकनको अशी ईच्छा होती.

* माझी भूमिका मवाळ का?असा प्रश्न अनेकांना पडला होता

* सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आम्हाला ह्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही.

* मराठा समाजाला वेठीस धरू नका.

* नाशिकमध्ये म्हणून मी समाजासाठी आक्रमक झालो, अस्वस्थ झालो

* समाजातील लोक अत्यंत दुःखी. कायदाही हातात घेतील अशी मानसिक स्थिती आहे.

* पण माझ्यामुळे समाज शांत आहे.

* आम्ही यापुढे हे सगळे चालू देणार नाही. सहन करणार नाही.

* अनेकांची ईच्छा आपण OBC मध्ये जावे. प्रत्येकाला विचार मांडायचे स्वातंत्र्य

* OBC मध्ये नवा प्रवर्ग तयार करून देता येऊ शंकतो का हे मी नाही उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस, अशोक चव्हाणांनी सांगायचं

* मी म्हटलं ना आता आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही ( उपरोधिक)

*बाबासाहेब आंबेडकरांचीही ईच्छा होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं

* 1967 मध्ये ओबीसीमध्ये आपल्याला आरक्षण मिळत होते.

* मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले, आज सरकार तुमचे. तुमच्या हातात हे आहे ते तुम्ही करू शकता नाही.

* 1 . 9 सप्टेंबर 2020 च्या आधी निकाल लागलेत त्यांना रुजू करून घ्या, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय

* 2. सारथीची काय अवस्था करून टाकली ? सारथीला जर योग्य ती मदत केलीत तर आरक्षणापेक्षाही कैक पटीने उपयोगी पडेल**

* सारथीत समाजाची लोकं घ्या ना. सारथीला 2 वर्षांत कमीत कमी 1000 कोटी रुपये द्यायला हवे. आम्ही नियोजन करतो ना

* नीट करा नाहीतर बंदच करून टाका. शाहू महाराजांच्या नावाने चालवू नका मला अध्यक्ष बोलवू नका

* आण्णासाहेब पाटील महामंडळला 10 लाख काय ? 25 लाख द्या

* दर जिल्ह्याला वसतिगृह द्या ना. सोलापूरला वसतिगृह दिलंय पण सुरूच नाही केलं.

काय आहेत ३ पर्याय?

* पहिला पर्याय : Review Petition फाईल करा, फुल प्रूफ प्लॅन करून हे Petition करू शकता

* दुसरा पर्याय : Review Petition टिकली नाही तर Curative Petition फाईल करा

* तिसरा पर्याय 342 A मार्फत आपल्या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचवू शकता.या माध्यमातुन आपलं प्रपोजल राज्यपालांसमोर मांडवं लागेल त्यांनतर केंद्रापुढे मांडावं लागेल. गायकवाड अहवालातील त्रुटी दूर कराव्या आणि मग तो अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे पाठवावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : बंडखोर उमेदवारीचे भाजपला मोठे आव्हान

News Desk

“राज ठाकरे चौकशीसाठी निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला ?”

News Desk

भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांनी घेतली अजित पवारांची भेट

News Desk