HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांतच्या प्रकरणांमूळे महाराष्ट्र सरकार अस्थिर होऊ लागली तर आधीच केंद्रातील सरकार पडेल – संजय राऊत

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येचा वेगळेच वळण लागले आहे. राजकीय वळण मिळाल्यामूळे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. दरम्यान, यात महाराष्ट्र सरकार स्थिर नसल्याचे टीका विरोधी पक्षाकडून वारंवार करण्यात आली. ही टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोडून काढत महाराष्ट्र सरकार स्थिर आहे, असे म्हटले आहे. आणि जर अशा प्रकरणांमूळे महाराष्ट्र सरकार अस्थिर होऊ लागली तर आधीच केंद्रातील सरकार पडेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी आज (१२ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.

“सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण करण्याची ही वेळ नाही. राजकारण न करता देश पुढे जावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सुशांतला न्याय मिळाली हीच माझी प्रार्थना आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

तसेच, शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून सुशांतच्या वडिलांनी २ लग्न केल्यामूळे सुशांत आणि त्याच्या वडलांमध्ये मतभेद होते, असे संजय राऊत यांनी लिहिले होते. यावरून सुशांतच्या चुलत भावाने राऊतांना ४८ तासांत माफी मागण्याचे नोटीस दिली आहे. त्यावर,“कुटुंबाची काय मागणी आहे कल्पना नाही. जर चुक झाली असेल तर विचार करावा लागेल. जी माहिती आहे त्यावरुनच मी बोलत आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी राजस्थानमधील राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्रात सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात मुसळधार पावसात सगळं वाहून गेलं असा टोलाही त्यांनी लगावला. नारायण राणे यांच्या ऑक्टोबरपर्यंतच सरकार टिकणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना प्रयत्न करु राहू देत असं संजय राऊत यांनी म्हटले.

“महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, शरद पवार तसंच सगळे मंत्री प्रयत्न कत आहेत. त्यातही कोणाला सरकार पाडणं, अस्थिर करणं यात रस असेल तर त्यांनी जनतेच्या दु:खावर पोळ्या शेकण्याचं काम करत राहावे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. येथे जनतेचं हित याला सगळ्यात मोठं प्राधान्य द्यावं लागतं. प्रधानमंत्र्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्राच्या हितावरच बोट ठेवलं होतं,” असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार! – अजित पवार

Aprna

आरबीआयच्या नव्या धोरणाला शरद पवारांचा विरोध!

News Desk

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी पक्ष १ कोटी पत्र पंतप्रधानांना पाठवणार

News Desk