HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आजपासून संचारबंदी लागू, जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यात जमावबंदी पाठोपाठ आता संचार बंदीही करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र हा अगदी निर्णायक टप्प्यावर आहे आणि या स्थितीला जर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला नाही तर सगळंच कटीण होणार आहे.दरम्यान, काल जनता कर्फ्यू दिनी नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाचे मुख्यमंत्र्यांनी कौतूकही केले. पण तरीही १४४ कलम मला लावावे लागले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, संचार बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. परंतु, रिक्षा, टैक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असणार आहे.

काल (२३ मार्च) राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या तर आजपासून जिल्ह्यांच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत. तसेच आंतरराज्यीय विमान सेवाही आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहणार आहे. सर्व प्रार्थना स्थळे, मंदिरे बंद राहमार आहेत. तसेच, जे कोरोनाबाधित आहेत त्यांनी आणि जे नाही आहेत त्यांनी सगळ्यांनीच काळजी घेण गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे निर्णय

* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थिती चिंताजनक, हा अत्यंत निर्णायक टप्पा

* आपल्यासाठी पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे

* जनतेला जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

* राज्यात नाईलाजाने संचार बंदी लागू करत आहोत

* राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करत आहोत

* देशांतर्गत विमानसेवा देखील बंद

* फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली राहणार

* अत्यावश्यक कामांसाठीच बस, रिक्षा आणि टॅक्सी सुरु राहणार

* आवश्यकता नसेल तर खाजगी वाहन बाहेर काढू नयेत.

* टॅक्सीत फक्त २ प्रवासी तर, रिक्षात फक्त १ प्रवासी

* प्रार्थना स्थळ बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

* कृषि उद्योग, बियाणे कारखाने उघडे असतील

* क्वारंटाईन केलेल्यांनी घराबाहेर पडू नये.

* आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्डसना देखील मेडिकल सेवेसाठी तयार करतोय

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवाजी पार्क’वरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही का?

Manasi Devkar

अंतरिम जामीनासाठी आता अर्णब गोस्वामींची धाव सर्वोच्च न्यायालयात!

News Desk

साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला

swarit