HW News Marathi
महाराष्ट्र

“लाथो के भूत बातों से नही मानते”, आता तर रस्त्यावर संघर्ष करावाच लागणार, मनसेची सरकार विरोधात आक्रमक भुमिका 

 

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत निवेदन, अर्ज बैठका, विनवण्या हे सगळे उपाय करुन झाले. तरीही सरकार ढिम्म आहे. त्यामुळे आता जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण,“लाथो के भूत बातों से नही मानते”, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार वीजबिलाच्या मुद्यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले नागरिकांना भरावीच लागतील, असे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे सरकारकडून आता वीज बिलांच्या मुद्द्यावर फेरविचार केला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यावेळी वीज बिलांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.

मात्र, तसे न झाल्यास ‘मनसे’कडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाऊ शकते. वाढीव वीज देयकांच्या विषयावर आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक असून, नेते आणि सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज (१९ नोव्हेंबर)  मनसे पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. वाढीव वीज देयकांवर घेतलेल्या यू-टर्नवर सरकारला घेरण्यासाठी बैठकीत आंदोलनाची व्यूहरचना ठरण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच !

News Desk

गोसलिया कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

News Desk

“मुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:साठी एक नोकरी घ्यावी”, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk