HW News Marathi
Covid-19

नियम न पाळल्यास ५ तालुक्यात लॉकडाऊन, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड अॅक्शन मोडमध्ये

यवतमाळ | कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली. यवतमाळ, पुसद, दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस या ५ तालुक्यात सर्वाधिक संख्या आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करावे, २६ फेब्रुवारीनंतर परिस्थिती आटोक्यात न आल्यास पाच तालुक्यात लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.

काल (२३ फेब्रुवारी) पोहरादेवी येथून दर्शन घेऊन आल्यावर मंत्री राठोड यांनी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. दरम्यान, आजपासून संजय राठोड यांनी पुन्हा कामाला जोरदार सुरुवात केली आहे. आज मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवानाही झाली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता सांगलीत कोरोना पाय पसरवणार नाही , जयंत पाटलांना विश्वास !

Arati More

लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९१ हजार गुन्हे दाखल

News Desk

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६,५६६ नवे रुग्ण, तर १९४ करोनाबाधितांचा मृत्यू

News Desk