HW News Marathi
महाराष्ट्र

वनमंत्री संजय राठोड मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रिमंडळ बैठकीला लावणार हजेरी

यवतमाळ | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी भाष्य केल्यानंतर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड आज (२४ फेब्रुवारी) मुंबईला रवाना झाले आहेत. यवतमाळमधील निवासस्थानाहून सकाळी ते पत्नीसह रवाना झाले. मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. संजय राठोड यवतमाळहून नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी त्यांची पत्नी शीतल राठोड सोबत आहे. “माझं सुरळीत काम सुरु झालं आहे. माझ्या शासकीय कामांना सुरुवात करतोय. मंत्रिमंडळ बैठकीला मी रवाना होतोय” अशी माहिती राठोडांनी निवासस्थानाहून निघताना दिली. आज दुपारी ३.३० वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा – मुख्यमंत्र्यांचे आदेश

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी ज्यांचे नाव सुरुवातीपासूनच अडचणीत आले आहे ते शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे काल (२३ फेब्रुवारी) माध्यमांसमोर आले. यावेळी, राठोड यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनाच्या पुन्हा वाढणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतेच काही नियम आणि निर्बंध कडक करूनही, सूचना करूनही पोहरादेवी येथे या सगळ्या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारची आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. “कोरोनाच्या काळात अशा रितीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर, संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी”, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

संजय राठोड नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशांनंतर स्वत: संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पोहरादेवी गडावर गर्दी झाली. पण मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आली. आजूबाजूच्या शहरातील लोकं तिथं आली. मुख्यमंत्र्यांना पूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे. मी सुद्धा सर्वांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा असं सांगितलं होतं. पण दहा दिवसांनंतर मी त्यांच्यात गेलो होतो. या दहा दिवसात ज्याप्रकारे प्रसारमाध्यमं, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांच्यामध्ये प्रचार झाला होता त्यामुळे स्वत:हून लोकं त्याठिकाणी आले. गर्दीबाबत लोकांना आवाहन केलं होतं. माझं काम सुरु आहे. मी दर्शन करुन आलो आणि जिल्ह्याची आढावा बैठक घेतली”, असे संजय राठोड म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष!- बाळासाहेब थोरात

News Desk

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची भौतिक प्रगती २७ टक्के

Aprna

मराठा आरक्षणाबाबत खंबीर, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

News Desk